सामाजिक

सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची दिपकआबांची मागणी

सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची दिपकआबांची मागणी

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात सर्वत्र ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतरही पावसाचे थैमान कायम असून यामध्ये तालुक्यातील बहुतांश पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला आहे. घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक घरांची पडझड होवून काही कुटुंबे बेघर झाले आहेत. शेतातील उभी पिके, फळबागा उध्वस्त झाले आहेत. तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून, शेती आणि बळीराजाला वाचवण्यासाठी सांगोला तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मागणी करणार आहे. यासह शेती पिके व फळ पिकांचे योग्य ते पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत शासनाकडे केली.

सांगोला तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत तालुका जलमय करून टाकला आहे. पावसाच्या पाण्यामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि गावचा संपर्क तुटला आहे. नागरिक वस्तीमध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेचा कणा असलेला आपला शेतकरी वर्ग मात्र यामुळे मोठ्या चिंतेत आहे. बळीराजाची अश्रू पुसण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त सदृश्य परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी तालुक्यातील बळीराजाची अवस्था सध्या “ना घर ना घाट का” अशी झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसामुळे शेतीचे खुप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नेहमी पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजाला आता याच पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतले आहेत. यामुळे त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ढगफुटी सदृश्य परिस्थितीबाबत संपूर्ण सांगोला तालुका दौरा करणार आहे. तसेच त्याबाबत शासनाला तातडीने मदत देण्याबाबत आवाहन करणार आहे.

तालुक्यातील डाळिंब, केळी, आंबा, द्राक्षे या फळबागायत पिकासह मका, सूर्यफूल, बाजरी, तूर, कांदा आणि भाज्या यांसारख्या बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. याशिवाय काढणीला आलेल्या मका, तूर, बाजरी या पिकाला मान्सूनच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. काढणी झालेली पिके पाण्यावर तरंगू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणवले असून, तालुक्यातील शेती आणि बळीराजा वाचवायचा असेल तर सरसकट ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाकडून योग्य ते पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करणार आहे असे ही मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!