राजकीय

विकासाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित – पोपटशेठ यादव

विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर चोपडी गटात महायुतीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

विकासाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित – पोपटशेठ यादव

विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर चोपडी गटात महायुतीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

सांगोला (प्रतिनिधी): चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित असून सर्वसामान्य जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्याचे काम महायुतीने प्रत्यक्ष कृतीतून केले आहे. पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांसह विविध विकासकामांच्या जोरावर चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचाच झेंडा फडकेल. “सांगोल्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. जनतेच्या विश्वासावर, केलेल्या कामांवर आणि विकासाच्या भक्कम पायावरच चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास शिवसेना नेते व चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना शिवसेना नेते पोपटशेठ यादव म्हणाले की, सांगोल्याचे पाणीदार माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात विकासाची गंगा वाहत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाणी प्रश्न मार्गी लागले असून, गावोगावी जलजीवन मिशन, नळ पाणीपुरवठा योजना आणि विकासकामांना गती देण्यात आली आहे. चोपडी गटातील अंतर्गत रस्ते, शेतरस्ते व दळणवळणाच्या सोयीसाठी कोट्यवधींची कामे मार्गी लावण्यात आली. पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी सिमेंट रस्ते, पुलांची कामे आणि दुरुस्ती प्रकल्प राबविण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर, वीज लाईन दुरुस्ती आणि शेतीसाठी वीजपुरवठा या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे.

आरोग्य, शिक्षण, महिला सशक्तीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महायुतीने सातत्याने प्रयत्न केले आहेत. केवळ आश्वासनांचे राजकारण न करता प्रत्यक्ष विकासकामांच्या जोरावरच महायुती निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात महायुतीला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत आहेत. विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर आधारित ही लढत असून चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित असल्याची भावना असल्याचे मत शिवसेना नेते व चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!