सांगोला नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम; “शेतकऱ्यांसाठी मोफत कंपोस्ट खताचे वाटप सुरू”
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - नगराध्यक्ष आनंदा माने व मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांचे आवाहन

सांगोला नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम; “शेतकऱ्यांसाठी मोफत कंपोस्ट खताचे वाटप सुरू”
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – नगराध्यक्ष आनंदा माने व मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांचे आवाहन
सांगोला (प्रतिनिधी): शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासह सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सांगोला नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून शहरातील घनकचरा व्यवस्थापन केंद्रात तयार करण्यात आलेले कंपोस्ट खत तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय खत उपलब्ध होणार असून पर्यावरण संवर्धनालाही मोठी मदत होणार आहे. विशेषतः ऊस, फळबागा, भाजीपाला तसेच इतर नगदी पिकांसाठी हे खत फायदेशीर ठरत असल्याने शेतकऱ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने आणि मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे
सांगोला शहरातील घनकचरा व्यवस्थापन केंद्र (कचरा डेपो) येथे शहरातून दररोज जमा होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून कंपोस्ट खताची निर्मिती केली जात आहे. हे खत जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी, सेंद्रिय कार्बनचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि पिकांच्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेषतः ऊस, फळबागा, भाजीपाला तसेच इतर नगदी पिकांसाठी हे खत फायदेशीर ठरत असल्याने शेतकऱ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा भाऊ माने आणि मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.
नगरपरिषदेकडून उपलब्ध करून देण्यात येणारे हे कंपोस्ट खत मोफत असून शेतकऱ्यांनी स्वतःचे वाहन घेऊन घनकचरा व्यवस्थापन केंद्रात जावे. तेथे कार्यालयीन वेळेत आवश्यक तेवढे खत उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी होण्यास मदत होणार असून सेंद्रिय शेतीचा प्रसारही वाढणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकरी सांगोला तालुक्यातील असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी सोबत ७/१२ उतारा आणि आधार कार्ड घेऊन येणे बंधनकारक करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना कंपोस्ट खत उपलब्ध करून दिले जाणार आहे.कचऱ्यातून खत, खतातून समृद्ध शेतीशहरातील कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करत त्यापासून उपयुक्त खत तयार करण्याचा नगरपरिषदेचा हा उपक्रम पर्यावरणपूरक ठरत आहे. एका बाजूला कचरा व्यवस्थापनाची समस्या कमी होत असताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना मोफत सेंद्रिय खत उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.



